Saturday, August 9, 2025
HomeMain Newsलोकवर्गणीच्या नावाखाली जीवन प्राधिकरणाकडून ग्राहकांनाच्या खिशावर दरोडा

लोकवर्गणीच्या नावाखाली जीवन प्राधिकरणाकडून ग्राहकांनाच्या खिशावर दरोडा

मौजे.विलासपूर ता .सातारा  जि. सातारा येथील पारशी विहीर येथील महाजल कार्यक्रमा अंतर्गत त्रिशंकू भागासाठी(साई सोसायटी.खिडवाडी) ४३९.५० लक्षची  पाणी पुरवठा योजना २८.७. २००९ रोजी मंजूर झालेली होती . या पाणी योजनेवर खर्च महाजल कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आलेला आहे . या रक्कमेच्या पोटी १० टक्के लोकवर्गणी  ४३. ९५ एवढी रक्कम  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भरलेली होती असे  त्यांच्याकडून सांगण्यात येते . या  योजने अंतर्गत   साई सोसायटी , व गोळीबार मैदानातील त्रिशंकू  भागासाठी पाणी पुरवठा केला जात होता . परंतु  नंतर खिंडवाडी ,विलासपूर,संभाजीनगर या भागासाठी हि पाणी पुरवठा या योजने अंतर्गत करण्यास सुरवात झाली . या सर्व भागांसाठी २००९ सालापासून  व  योजना पूर्ण झाल्यापासून लोकवर्गणी वसूल  केली जात आहे . प्राधिकरणाकडून लोकवर्गणीची १० टक्के रक्कम रुपये ४३. ९५ लक्ष  गेल्या  ११ वर्षात पूर्ण वसूल झालेली असताना ही तशीच पुढे ग्राहकांकडून वसूल केली जात आहे . गेल्या १० ते १२ वर्षात विलासपूर ,खिंडवाडी ,संभाजीनगर ,साई सोसायटी  व त्रिशंकू भाग धरून ७ ते ८ हजार नळ  कनेक्सन देण्यात आली आहेत . व प्रत्येक पाणी कनेक्सनसाठी ग्राहकांकडून ५००० रुपये लोकवर्गणी जमा केली जात आहे . व तशीच पुढे अजून वसूल केली जात आहे . प्राधिकरणाने लोकवर्गणीची भरलेली रक्कम ४३.९५ लक्ष एवढी वसूल झालेली  असताना हि  आज पर्यंत ग्राहकांकडून जबरदस्तीने लोकवर्गणी ,अंशदान , रक्कम वसूल केली जात आहे . जे पाणी कनेक्सन ३१५० रुपयात मिळते ते लोकवर्गणी ५००० रु व अंशदान ५००० रु मुळे १३१५० रुपयावर जाते . त्यामुळे  लोकवर्गणीच्या नावाखाली जीवन प्राधिकरण ग्राहकांच्या खिशावर दरोडा घालत आहे . आणि करोनात व्यस्त असलेले सरकारला यांच्या कडे पाहण्यास वेळच नाही . त्यामुळे हि दरोडेखोरी कोण थांबवणार हा मोठा घण  प्रश्नच आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments