उत्तर प्रदेशतील हाथरस मध्ये घडलेला निर्घृण सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांची अमानुष भूमिका, तसेच बलरामपूर येथील घटनेच्या बाबत व यूपी सरकारच्या असंवेदशील भूमिकेचा जाहीर निषेध म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज निदर्शने करण्यात आली. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, विद्रोही विद्यार्थी संघटना व पुरोगामी संघटनांचे वतीने हि निदर्शने आयोजित करण्यात आली होती.यावेळी *अत्याचारग्रस्त तरुणीला न्याय मिळालाच पाहिजे ! आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी ! उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करण्यात यावे व तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी.*_या मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या._ यावेळी साथी *विजय मांडके,साथी मिनाज सय्यद,प्रा. डॉ विजय माने, जेष्ट विधितज्ञ राजेंद्र गलांडे, प्रा.डॉ. मनिषा शिरोडकर, प्रा.डॉ.प्रकाश कांबळे,शैला यादव, अमित कांबळे,रश्मी लोटेकर, .पायल गाडे,महेश गुरव , रोहित क्षीरसागर,शुभम ढाले, संकेत माने* इत्यादी सहभागी झाले होते