ब्रम्हणाळ (ता.पलूस )येथे पुरात अडकलेल्या ३२ नागरिकांना बाहेर काढत असताना नाव पलटी झाली असून नावेतील १४ जणांचा मुर्त्यू झाला आहे .त्यांचे मृतदेह सापडले असून इतर १६ जणांचा शोध सुरु आहे .ब्रहमनाळ येथे कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो .संध्या कृष्णा नदीला महापूर आला असून ब्रहमनाळ येथे नदीचे पात्र अक्राळ विक्राळ बनले आहे .संपूर्ण ब्रहमनाळ गावाला महापुराचा पाण्याने वेढा दिला असून ,गावात तीन दिवसापासून पाणी आहे .
गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे .गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या नावेतून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोचवण्यात येत होते .नावेत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ३२ जण बसले होते .नाव कडेने गावाबाहेर जात असताना नावेचा पंखा पाण्यातील झाडात आणि पाईप मध्ये अडकला .नावेतील वाढलेले वजन आणि पंखा अडकल्याने नाव उलटली .पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने नावेतील कोणालाच काहीही करता आले नाही .पोहता येणारे दोघेजण पाण्यात झाडाझुडपांना धरून राहिले .मात्र इतरजण बुडाले .बत्तीस पैकी १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत .त्यापैकी काही पाण्याबाहेर वाहून जाऊन कडेला अडकले होते .
आणखी १६ जण बेपत्ता असून ,त्यांचा शोध सुरु आहे .स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय पथक बचाव कार्यात सहभागी आहे .घटनासथळी आक्रोश आणि गोधंळ सुरु आहे .गावात आणखी २०० ग्रामस्थ अडकून पडले असून ,.त्याच्यासाठी बोटींची सोय अजून करण्यात आलेली नाही .असा आरोप गोवकऱ्यानी केला आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर ,सातारा , सांगलीत पूरस्थिची पाहणी करण्यासाठी आले होते .