भाजपसाठी शिंदे गट हे आता बिनकामाचे ओझे ठरल्याने ओझे कसे फेकता येईल यावर दिल्ली व महाराष्ट्रात कार्य सुरु आहे. आश्चर्य असे की कालचे बाहुबली श्री. फडणवीस राज्यातील या सगळ्या उपक्रमात पूर्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठी उलथापालथ ही भाजप अंतर्गत सुरु आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. असं म्हणत सामनातून पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडवून देण्यात आली आहे.
अजित पवार हे नाराज असून लवकरच ते राष्ट्रवादीला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षाच्या तंबूत सहभागी होतील व मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, अशा वावड्या उठवल्याने राज्यात म्हणे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार, सगळं वातावरण ढवळून निघणार वगैरे चर्चांना उधाण आलं, पण असे प्रत्यक्ष उद्याण कुठे दिसेल तर शपथ! अजित पवार यांनी मुंबईत आमदारांची तातडीची बैठक बोलावली असून 40 आमदारच्या पाठिंब्याचे पत्र त्यांच्या हाती फडफडत असल्याचे वृत्त माध्यमांवर गेल्या चार दिवसांपासून तडतडत आहे. पण अजित पवार यांनी स्वतदेखील आता साफ इन्कार केला आहे असं सामनातून म्हंटल आहे.
भाजपसाठी शिंदे गट हे आता बिनकामाचे ओझे ठरल्याने ओझे कसे फेकता येईल यावर दिल्ली व महाराष्ट्रात कार्य सुरु आहे. आश्चर्य असे की कालचे बाहुबली श्री. फडणवीस राज्यातील या सगळ्या उपक्रमात पूर्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठी उलथापालथ ही भाजप अंतर्गत सुरु आहे की काय? अशी शंकाही सामनातून उपस्थित करण्यात आली आहे.
भाजपकडे स्वतचे असे काहीच नाही, दुसऱ्या पक्षातील लोक उधार घेऊन ते स्वताचा पक्ष चालवीत आहेत. कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वतःचे घर भरायचे ,काँग्रेसवरही त्यांची वाईट नजर आहेच. धमक्या, दबाव आणि तपास यंत्रणाची सुरामारी यामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्यच संपवून टाकले. अजित पवारांच्या बाबतीत वावड्या आणि वातावरण गढूळ करण्याचे काम त्यांनीच केले. महाराष्ट्राला अस्थिर, बदनाम व गोधळ निर्माण करण्याचे कारस्थान आहे असं म्हणत सामनातून सध्याच्या राजकीय चर्चांवर भाष्य केलं आहे.