कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात मोठी दुर्घटना घडली आहे . वादळी वाऱ्यात स्पीड बोट पलटी होऊन एक जण जलाशयात बुडाला असून दोघेजण सुदैवाने बचावले आहेत . स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला ,मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड पावसामुळे शोधकार्यात अडथळे आले . या घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले . याबाबतची माहिती अशी की ,कोयना जलाशयावर तापोळा ते आहेर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे . यावेळी कामाची पाहणी करण्यासाठी काही अधिकारी बोटीने तापोळ्याला गेले होते . पुलाच्या कामाची पाहणी माघारी येत असताना तेटली हद्दीत वादळी वाऱ्यामुळे स्पीड बोट जलाशयात पलटी झाली . यावेळी गजेंद्र बबन राजपुरे वय ४२ वर्ष रा . दरेवाडी वाई ;यांचा बुडून मृत्यू झाला . सतीश थोरवे वय ५२ रा . वाई ,बालेश्वर महातो वय ४२ हे बचावले आहेत . आधारामुळे शोध मोहीम थांबवली असल्याने जलाशयात बुडून मुर्त्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडलेला नाही . रात्री उशीरा पर्यंत शोध मोहीम सुरु होती . आज परत शोध मोहीम सुरु केली जाणार आहे .
हद्दीत घडलेल्या या घटनेत कंपनीचे दोन अधिकारी बचावले ,मात्र एकाचा बुडून मृत्यू झाला त्यांनी लाईफ जॅकेट परिधान केले नव्हते का ? बोट मालक कोण होता . बोट चालकाकडे प्रवाशी वाहुतुकीचा परवाना होता का ? अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत .