केंद्र सरकारकडून खाजगी व सहकारी साखर कारखान्यांना दोन वर्षाचे १४०० ते १५०० कोटी येणे आहे . सरकार शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्या केंद्राने दुसऱ्या बाजूला हक्काचे पैसे अडवून शेतकऱ्यांची गळचेपी का केली आहे . असा सवाल गृहराज्यमंत्री शुभूराज देसाई .यांनी आज केला . हे पैसे देण्यासाठी पंतप्रधानांना विशेष विनंती करावी अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असल्याचे श्री देसाई यांनी सांगितले . आपण राज्याचा मंत्री म्हणून न्हवे सहकारी साखर कारखान्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . ते म्हणाले केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे म्हणून सांगत आहेत . दुसऱ्या बाजूला कारखान्यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी जी रक्कम लागते . ते हक्काचे पैसे थकवत आहेत असे ते म्हणाले .