Friday, August 8, 2025
HomeMain Newsकेंद्र सरकारकडून रिलान्स कडील महामार्गावरील दोन टोलनाक्याचे ठेके काढून घेतले .

केंद्र सरकारकडून रिलान्स कडील महामार्गावरील दोन टोलनाक्याचे ठेके काढून घेतले .

पुणे – सातारा  राष्ट्रीय महामार्गावरील खेडशिवापूर आणि आनेवाडी  या दोन टोल नाक्यावरील वसुलीचा ठेका रिलान्स इन्फ्रा स्टक्चर लि  कंपनीकडून अखेर काढून घेण्यात आले आहेत . महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम पूर्ण न  केल्याने केंद्र सरकारने रिलान्सचा टोलवसुलीचा ठेका रद्द केला आहे . सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या ठिकाणी टोल  वसुली करीत आहे . तसेच प्रत्येक महिन्याला जमा होणाऱ्या २५ कोटी टोल वसुलीतून महामार्गारवर सहा पदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे .

१ ऑक्टोबर २०१० रोजी पुणे – सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाला सुरवात झाली . हे काम ३१ मार्च २०१३ रोजी पूर्ण होणार होते . ते अजूनही पूर्ण झालेले नाही . केंद्र सरकारच्या नियमानुसार सहापदरीकरणाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण झाले नाही तर मधल्या काळात टोल वसुली करता येत नाही . केंद्राने तशी नियमात सुधारणा करून सहा पदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल  वसूल करण्यावर बंदी घातली आहे . तरी सुद्धा नियम ,कायदे धाब्यावर बसवून पुणे -सातारा राष्ट्रीय महामार्गावर एका वर्षात अडीचशे कोटी रुपये टोल  जमा होतो , ही अधिकृत आकडेवारी आहे . त्याचा विचार करता गेल्या आठ वर्षात रिलान्स इन्फ्रा लि कंपनीने तब्बल दोन हजार कोटी रुपये टोल वसूल केला आहे . आणि हे संपूर्णपणे बेकादेशीर आहे . सामाजिक कार्यकर्ते ऍड .प्रवीण वाटेगावकर यांनी या संदर्भात उच्य न्यालयात  जनहित याचिका दाखल केली आहे . राष्ट्रीय महामार्ग ४ च्या टप्प्यात पुणे – सातारा विभागात हवेली येथील खेडशिवापूर आणि जावळी तालुक्यातील आनेवाडी या दोन ठिकाणी सन २०१० मध्ये टोल वसूल करण्याचे कंत्राट रिलान्स कंपनीला २४ वर्ष करारावर देण्यात आले . त्यावेळी या टोलवसुलीतून चार पदरी रस्ता अडीच वर्षात सहा पदरी करण्याची अटही घालण्यात आली होती .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments