Friday, April 25, 2025
HomeUncategorizedकास हे आपल्या आयुष्याचे शेवटचे ठिकाण होऊ नये

कास हे आपल्या आयुष्याचे शेवटचे ठिकाण होऊ नये

सातारा येथील कास पठार हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत आल्यापासून जगभरातून पर्यटक इथे येत असतात . हे जरी सातारच्या दृष्टीने अभिमानाचे असले तरी येणारा पर्यटक निर्सगाचा  आनंद घेण्याऐवजी निसर्गाची हानी करताना जास्त दिसत आहे . कासला  गाड्यांच्या धुराचे प्रदूषण ,प्लास्टिक कचरा याचे जास्त प्रमाण वाढलेले दिसत आहे . नैसर्गिक शुद्ध हवेचे कास काही दिवसांनी प्रदूषणाचे माहेरघर होऊ नये . याची भीती मनात येत असते . येणार पर्यटक हा निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी मद्यधूंद अवस्थेत कायमच बघण्यास मिळतो . रस्त्याच्या कडेला उभा राहून दारू पिणे ,कपडे काढून उघडे नाचणे ,दारु पिऊन वेगाने वाहने चालवणे ,ट्रॅपिकचे कोणतेही नियम न पाळणे ,या मुळेच वारंवार अपघाताच्या घटना कास रोडला घडताना दिसत आहेत .

सातारला पर्यटक हे पुण्या मुंबई वरून येणारे जास्त असतात . कास हे ठिकाण दारू पिऊन धिगाणा करण्याचे ठिकाण म्हणूच प्रशिध्द होत आहे . बऱ्याच वेळा गाड्या चालवणारे मद्यधूंद अवस्थेत असतात . वाहने चालवताना ते भानावर नसतात . याचा तोटा इतर वाहधारकांना अपघाताच्या रूपाने सोसावा लागतो . सातारा ते कास रोडवरती  बोगद्यापासून पुढे घाटात अनेक प्रेमी युगल चाळे  करीत बसलेले असतात . त्यांची वाहने  बाजूला पार्क केल्यामुळे रस्ता अपुरा पढतो आणि अपघात पण होत असतात . अलीकडेच मोबाईल मुळे तरुणांना नेहिमीच सेल्फीची भुरळ पडलेली असते . रस्त्याच्या मधोमध गाड्या लावून फोटो काढणे ,दारू पिऊन नाचणे  हे नेहिमीच पाहण्यास मिळत असते . या रस्त्यावर कुढेच पोलीस चेक नाका किंवा पोलीस चौकी नाही . त्यामुळे कुणालाच धाक राहिलेला नाही . नियम राहिलेले नाहीत . आणि अपघात होण्याची हि मूळ कारणे  आहेत . पुण्याच्या गाड्या नेहिमीच नियमाचे उलंघन करीत असतात .

परंतु पोलिसांकडून कोणतीच कारवाही होताना दिसत नाही . हा घाटमाध्यावरचा वळणाचा ,रस्ता असल्याने या रस्त्यावर कॅमेरे बसवून ६० स्पीडची मर्यादा ठेवली पाहिजे . जो पर्यंत असे नियम होणार नाहीत तो पर्यंत कुणीच आपली वाहने नियमाने चालवणार नाही . नाहीतर असेच अपघात भविष्यात होत राहणार . आनंदाच्या नावाखाली अनेकांचे जीव जात राहणार आहेत . बाहेरून येणाऱ्या पर्यटकांकडून बऱ्याचदा चांगल्या कौटूंबिक पर्यटकाला त्रास सहन करावा लागतो . कास तलाव हा तर दारुड्याचा अड्डाच झालेला आहे .आणि हेच लोक प्लास्टिक कचरा रस्त्यावर तलावाच्या बाजूने फेकत असतात . आणि आम्ही सातारकर जर वाशी पोती घेऊन हा कचरा उचलण्यास जातो . यासाठी कास तलाव व परिसरात कचऱ्यासाठी जागोजागी मोठ्या कुंड्या ठेवणे गरजेचे आहे . जेणेकरून आपण आणलेला कचरा या कुंड्यांमधून पर्यटकांना टाकता येईल . व सगळीकडे पसरलेला कचरा दिसणार नाही . आणि हे होणारच नसेल तर कास पठार परिसरात प्लास्टिकला बंदी घातली तरच पर्यावरणाचा समतोल राहू शकतो .

कासच्या धरणाच्या वरती गाड्या घेऊन जाऊन रील करणे ,अशा पर्यटकांना दंड आकाराला पाहिजे ,कास तलावामध्ये गाड्या घालून धुणे या मुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे . असे प्रदूषण करणाऱ्या पर्यटकांसाठी नगरपालिकेने नियमावली तयार करणे गरजेचे आहे . पर्यावरणाचा आनंद घेत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही .यांचेकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे . कास रस्त्यावरती अलीकडच्या काळात झालेल्या अपघातामध्ये तरुण मुले जास्त मुर्त्यूमुखी पडलेली आहेत . रील करत धबधब्याच्या जवळ जाणे ,वाहने बेधूंद चालवणे यामुळेच जास्त अपघात होत आहेत . रील करताना तरुणांनानी आपली शेवटची रील होऊ नये यासाठी काळजी घ्यावी . हे सर्व थांबवयचे असेल तर पोलीस,नगरपालिका व जिल्हा प्रशासन यांनी मिळून नियमावली तयार करणे गरजेचे आहे . अशा घडणाऱ्या घटनांना पायबंद घालणे गरजेचे आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments