जावळी तालुक्यातील एकिव येथील धबधब्याजवळील ७०० फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मुर्त्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती .या घटनेचा पोलिसांकडून तपास केला असता . या तरुणांचा धबधब्यात पडून नाही तर त्यांना ढकलून दिल्यामुळेच मुर्त्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . वादावादीमध्ये अनोळखी दोन पर्यटकांनी दोघा तरुणांना दरीत ढकलून दिले . हा प्रकार प्रतक्ष पाहिल्यानंतर पोलिसांनी मेढा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे . याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ,कि जावळी तालुक्यातील एकिव धबधब्यावर रविवारी दुपारी पर्यटनासाठी सातारा शहर परिसरातील गावातील काही युवक गेले होते . यामध्ये पंकज शिंदे ,समाधान मोरे (बसाप्पाची वाडी ता . सातारा ) आणि अक्षय अंबवले ,गणेश फडतरे हे चौघेही एकत्र धबधबा पाहण्यासाठी गेले होते . साधारणतः सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंकज शिंदे आणि समाधान मोरे हे दुचाकीवरून पुढे निघाले . यावेळी त्यांना जाताना पाहताच त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून अक्षय अंबवले आणि गणेश फडतरे या दोघांनी पहिले . खूप वेळ झाला तरी ते दोघे अद्याप आले नाहीत . म्हणून पंकज शिंदे हा दुचाकीवरून परत त्यांना पाहण्यासाठी आला . त्यावेळी दोन तरुण अक्षयला लाथाबुक्यांनी मारहाण करीत होते . तर त्यांच्यासोबत असलेली इतर मुले रस्त्यावर उभी होती . गणेश फडतरे हा भांडणे सोडवण्यासाठी गेला असता त्यालाही ती मुले मारहाण करू लागली . त्यानंतर त्या दोन मुलांनी अक्षय आणि गणेशाला ७०० फूट खोल दरीत ढकलून दिले . पंकज शिंदे व त्यांचा मित्र समाधान येथे येताच सर्व मुले तेथून पळून गेली .
या प्रकानंतर पंकजने मेढा पोलीस आणि शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरु केले . रात्री मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे दरीत उतरणे अत्यंत धोकादायक होते . अशा अवस्थेतही ट्रेकर्सच्या जवानांनी दरीत उतरुन अक्षय शामराव अंबवले वय २८ रा . बसाप्पाचीवाडी ता . सातारा गणेश अंकुश फडतरे वय ३४ रा. करंजे पेठ सातारा या दोघांचा मृतदेह रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दरीतून वरती काढला . या दोन्ही मूर्तदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले . या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .