ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानी बाबत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी जिल्यातील सर्व तासिलदारांना आज दिले आहेत . शेती पिकांच्या नुकसानी बाबत संयुक्त पंचनामे करून शेती पिकांच्या नुकसानी बाबत बाधीत शेतकऱ्यांना १३ मे २०१५ च्या शासन निर्णयाने विहीत केलेल्या दराने मदत देण्याबाबत अहवाल सादर करावा . येणाऱ्या प्रस्तावा मध्ये एकाच लाभार्थ्याला मदतीची दिरुक्ती होणार नाही . याची दक्षता घ्यावी तसेच अहवाल तात्काळ सादर करावा असे निर्देश हि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत .