सातारा जिल्ह्यातील सर्व न्यालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते . या अदालतीमध्ये जास्ती जास्त पक्षकारांनी लाभ घेऊन आपली प्रकरणे तडजोडीने मिटवावीत ,असे आव्हान जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जे धोटे यांनी केले . जिल्हा न्यालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन आज करण्यात आले होते . या लोकअदालतीचे उदघाटन जिल्हा सत्र न्यायाधीस एम .जे . धोटे यांच्या हस्ते झाले . या प्रसंगी जिल्हा न्यायाधीस एन.एल.मोरे ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृपती जाधव ,वकील संघाचे अध्यक्ष सुखदेव पाटील ,जिल्हा सरकारी वकील ऍड.. महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते . या प्रसंगी बोलताना जिल्हा सत्र न्यायाधीश एम .जे . धोटे म्हणाल्या कि ,राष्ट्रीय लोकअदालत ही पक्षकारांच्या कल्याणासाठी असून यामध्ये कोणत्याही पक्षकारांचे नुकसान केले जात नाही . लोकअदालतीमुळे पक्षकारांचा वेळ ,पैसा ,वाचणार आहे . आज आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये जास्ती जास्त पक्षकारांनी सहभाग नोंदवून आपली प्रकरणे निकालात काढावीत ,असे आव्हान त्यांनी केले .
आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीत धनादेश न वटलेली प्रकरणे ,वादपूर्व प्रकरणे ,वैवाहिक वाद,थकीत ग्रामपंचायतीची मालमत्ता कर व पाणी बिलाची प्रकरणे ठेवण्यात आली होती . जिल्ह्यातील प्रलंबित सुमारे १० हजार १२२ प्रकरणे चर्चेसाठी ठेवली होती . तसेच ग्रामपंचायतीची थकीत पाणीपट्टी व घरपट्टी वादपूर्व प्रकरणासाठी पंचायत समिती ,सातारा येथे एक पॅनल ठेवण्यात आले होते . अशी माहिती प्रस्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृपती जाधव यांनी दिली . या कार्यक्रमास जिल्हा न्यालयातील न्यायाधीश ,वकील ,पक्षकार उपस्थित होते .