सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था झालेली असून . वाढे फाटा ते लोणंद मार्गावर मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे . सातारा ते लोणंद १ तासाचे अंतर खड्यांमुळे २ ते अडीच वेळ खात आहे . यातच वेण्णा व कृष्णा नदीच्या पुलांचे दुरुस्तीचे काम झालेले नसल्यामुळे या दोणी पुलांवर खड्डे पडून पाणी साचत आहे . अनेकवेळा या दोन्ही पुलांवर अपघात झाले आहेत . या बाबत ग्रामस्तानी रस्ता दुरुस्ती बाबत माहिती देऊन हि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्त या रस्तावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशानी व नागरिकांनी वाढे येथील पुलावर खड्यात बसून अनोखे आंदोलन केले आहे . येत्या २५ तारखेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे .